"आंदोलक" सुरेश बोतालजी '
साजूरची दंगल, निवेदन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना..!
29 May, 2025
१९९९साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी शपथ घेतली.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधीला अभिवादन करण्यासाठी विलासराव देशमुख साहेब थेट येणार होते. तत्कालीन कराड दक्षिण चे आमदार विलासराव पाटील (काका)यांच्या आग्रहाखातर विमानतळाचे बाहेरीलबाजूस सामान्य लोकांचा सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री महोदय समाधीस्थळी जाणार असे नियोजन करण्यात आले.यावेळी पोलीस उपअधीक्षक सातारा( ग्रामीण)प्रकाश मुत्याल यांचेकडे पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याने पोलीस अधीक्षक सातारा चा तात्पुरता कार्यभार होता.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पद कार्यान्वित नव्हते.कराड उपअधीक्षक मधुकर तळपाडे हे विमानतळावर मुख्यमंत्री बंदोबस्त प्रभारी होते.(साजूर दंगलीमुळे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे आणि पोलीस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे संबध समन्वयाचे नव्हते.मात्र Dysp मधुकर तळपाडे आणि माझे संबध चांगलेच जपले होते.) सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आंदोलने करणारा चेहरा म्हणून माझा होता, माझी रोजच आंदोलन होत होती, त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी माझी नोंद सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहिली असेल , सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आंदोलन करणारा त्या काळामध्ये कोणता कार्यकर्ता असेल तर माझे नाव असेल, 1995, 96, 97, 98,९९ ते आज अखेर पर्यंत मी सामाजिक कार्यात ,कार्यरत आहे, आज पर्यंत ची, माझी सर्व आंदोलने हे जनतेच्या हितासाठी झालेली आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्ट करी, गोरगरिबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून केलेले आंदोलन असतील , अन्य अत्याचार झालेल्या लोकांच्या करता केलेली आंदोलन असतील,ही सर्व आंदोलने हे पब्लिक रिलेटेड आंदोलन असल्यामुळे त्या काळामध्ये पोलीस स्टेशनला ,माझ्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही, त्या काळातले पोलीस यंत्रणा पोलीस अधिकारी हे प्रामाणिक आणि सरळ मार्गातले होते,आमचे पोलिसांच्या बरोबरचे सलोख्याचे संबंध होते ,दलित महासंघासंघाचा सातारा जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करत असताना अनेक समस्येला तोंड देत ,हजारो लोकांचे भले केले, ते करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर कधीही आर्थिक तडजोड केलेली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचे माझे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही आमदार , खासदारांना मी विंदा नव्हतो, त्यामुळे माझा राजकारण मध्ये धबधबा त्या काळामध्ये चांगला होता,महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात माझा मोठा प्रभाव होता, शिवसेनेनंतर एक आक्रमक दलित महासंघ या संघटनेचा १९९९ मध्ये चांगला दबदबा निर्माण झाला होता.दररोज कुठेना कुठे मोर्चा,धरणे,रास्तारोको अशी आंदोलने असायची.शेकडो कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले होते...कार्यकर्त्यांना कुठल्या ना कुठल्या कोर्टात हेलपाटे मारावे लागत होते म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांना भेटून कार्यकर्त्यावरील खटले मागे घ्या!यासंदर्भात आंदोलन करून मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळची डीवायएसपी मधुकर तळपाडे हे अधिकारी होते, तळपाडे साहेब आणि माझे चांगले संबंध होते ,मला नेहमी त्यांचे ,या सामाजिक चळवळीत तन मन धना सह सहकार्य असायचे, सातारचे श्रीधर जाधव साहेब यांनी माझे शिष्टमंडळाला मुख्यमंत्री महोदयांसोबत भेट घडवून दिली, श्रीधर जाधव साहेब आणि डी वाय एस पी तडफडे साहेब यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्रीचे संबंध होते आणि ते नेहमी मला या कार्यामध्ये सहकार्य करत आणि त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री महोदय यांच्याशी विचार विनिम करण्याची संधी मिळाली!
प्रकाश वायदंडे कराड तालुका अध्यक्ष पद होतं,शशिकांत भिसे जिल्हाध्यक्ष,आणि राजू दिवाण ,राम दाभाडे,दस्तगीर आगा,विजय वायदंडे यांचेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते कराड विमानतळावर सकाळी आठ वाजता आम्ही पोहचलो.आम्हाला स्वतः मधुकर तळपाडे हे बाजूला घेऊन उभे होते.मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांचे विमान सव्वा आठ उतरले.
वातावरणात गडबड सुरू झाली मुख्यमंत्री महोदयांना बघण्यासाठी धांदल उडाली.मुख्यमंत्री विमानातून उतरून स्थानिक लोकप्रतिनींचा सत्कार स्वीकारून सरळ पायी चालत विमानतळाचे बाहेरीलबाजूस उभारलेल्या शामियान्यात दाखल झाले.त्यांच्यासोबत आ.विलासराव पाटील (काका),तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक ओमप्रकाश बाली होते.मधुकर तळपाडे, श्रीधर जाधव साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला स्टेजवर घेऊन गेले.निवेदन शशिकांत भिसे यांचे हातामध्ये होते.आम्ही सर्वानीच निवेदनास हात लावून मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले ...!. '
दलितांचा संघर्ष,'आंदोलक सुरेश बोतालजी पुस्तक लवकरच...!
-सुरेश बोतालजी