single-post

या कंपनीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा- सुरेश बोतालजी

सातारा पंढरपूर मार्गावरील काँक्रिटीकरण केलेल्या निकृष्ट रस्त्याची मेघा इंजिनिअरिंग या कंपनीची एस आय टी मार्फत चौकशी करावी

08 May, 2025

सातारा, दि. ८: सातारा पंढरपूर रस्त्याचे नवीन विस्तारीकरणाचे काम करत असताना अनेक पिढीचे साक्षीदार असलेले वृक्ष मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आलेली आहे. त्या जागी नवीन वृक्ष लागवड निविदा मध्ये दिसून येत आहे. परंतु, प्रत्यक्षात वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमध्ये दिरंगाई केल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न करता हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे संबंधित मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर मनुष्यवधाच गुन्हा दाखल करून  एसआयटी मार्फत सातारा पंढरपूर कॉंक्रिटीकरण निकृष्ट रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी भारतीय बहुजन सेनेचे, भारतीय हिंदू महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी केलेली आहे.

या कंपनीने निविदा नुसार कागदोपत्री दोन लाखाची वृक्ष लागवड करून रस्ते विकास नावाखाली ३० लाख रुपये बेकायदेशीर बचत केली आहे. एवढेच नव्हे तर एक गुन्हा पचला म्हणून दुसरा गुन्हा म्हणजे या भ्रष्ट कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे . रस्त्याला काही महत्त्वाच्या गावच्या हद्दीमध्ये भेगा पडलेले बुजवण्याचं काम सध्या चालू आहे. हा पुरावा असून सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व गुणवंत नियंत्रक आणि संबंधित यंत्रणा कारवाई करण्यापासून का? अलिप्त राहिले आहे असा प्रश्न पडला असून  सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार आहेत.


मेघा इंजीनियरिंग कंपनीने या रस्त्याचे काम काम करत असताना कोणत्याही पद्धतीचे सेफ्टी रुल्स फॉलो केलेले नाही. या रस्त्यावर आजपर्यंत ६४ प्रवासी मृत्युमुखी पावलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही स्वरूपाचे नुकसान भरपाई दिलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या कंपनीवर  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल केला नाही? संबंधित सर्वच अधिकाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी तसेच कोरेगाव पंढरपूर हा रस्ता म्हणजे मौत का कुवा बनलेला आहे. निरापराधी प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी भारतीय बहुजन सेना, भारतीय हिंदू महासंघ रिपब्लिकन समता पार्टी तीव्र आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.