single-post

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच खरा विवेकी माणूस तयार होईल-राजू परुळेकर

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला हवा : डॉ. आ. ह. साळुंखे

28 February, 2025

सातारा  : अज्ञानामुळेच अंधश्रध्दा निर्माण होते आणि माणसे आपल्या हानीला कारणीभूत ठरतात. त्यासाठी समाजाला ज्ञानाकडे घेऊन जायला हवे, तरच महाराष्ट्र शासनाने केलेला जादूटोणाविरोधी कायदा समाजावर प्रभाव असणाऱ्या लोकापर्यंत अधिक परिणामकारक पोहचू शकेल. डॉ. विलास खंडाईत यांची तळमळ यासाठीच आहे असून तत्त्वांच्या प्रयत्नामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल असा विश्वास प्राच्यविद्यापंडीत डॉ. आ. ह. साळुखे यांनी व्यक्त केला.

सातारा येथे डॉ. विलास खंडाईत यांनी पीएचडी संशोधनावर आधारित लिहिलेल्या जादूटोणाविरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रमम या मराठीतील पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवादीत पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी  डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. यावेळी बिद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव, इंग्रजी पुस्तकाचे अनुवादक ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. अरुण सोनकांबळे, प्रकाशक राकेश साळुंखे, डॉ. विलास खंडाईत आदी उपस्थित होते.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणे अवघड काम असते. कारण, शब्दाशी बांधिलकी ठेवून हे काम करावे लागते. इंग्रजीतील अनुवादित पुस्तक जगात तर हिंदीच भारतभर पोहोचणार आहे. खंडाईत हे अंधश्रध्दा आणि जादूटोणाविरोधी चळवळ अधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर व्हावी, ज्ञानाच्या प्रकाशात समाज उजळून निघेल यासाठी खंडाईत यांची धडपड  कौतुकास्पद आहे. त्यांच्या या धडपडीला नक्कीच यश मिळेल, डॉ. पाटणकर म्हणाले, माणसांच्या मनात भीती निर्माण झाल्यानंतरच अंधश्रध्दा जन्म घेत असते. अंधश्रध्दा अनाठायी आहे. समाजातील अंधश्रध्दा निर्मूलनासाठी मोहीम उघडावी लागेल.

या चळवळीत आपणालाही उतरावे लागणार आहे. कारण, अंधश्रध्देतून निर्माण होणाऱ्या दुखःचे मूळ नष्ट करायलाच हवे. अंधश्रध्दा ही मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि देवीहीआहे. आपलं जीवन असुरक्षित आहे म्हणून आपण एखादी गोष्ट पकडतो. त्यातीलच अंधश्रध्दा हा एक प्रकार आहे.याबाबत जनजागृती आवश्यक आहे. डॉ. विलास खंडाईत यांच्या पुस्तकामुळे कायद्याची माहीती सर्व स्तरावर पोहबण्यासाठी मदतच होणार आहे, असे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी स्पष्ट केले.परुळेकर म्हणाले, "अंधश्रद्धा ही मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि दैवीही आहे. आपले जीवन असुरक्षित आहे, म्हणून आपण एखादी गोष्ट पकडतो. त्यातीलच अंधश्रद्धा हा एक प्रकार आहे." अंधश्रद्धा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयही आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच खरा विवेकी माणूस तयार होईल, 

  दरम्यान डॉ.अनिमिष चव्हाण, डॉ. अरुण सोनकांबळे या अनुवादकांनीही पुस्तकासंबधी भूमिका स्पष्ट केली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. प्रा. श्याम मानब यांच्या शुभेच्छा संदेशाचे बाचन डॉ. शिवाजी कांबळे यांनी केले. डॉ. विनोद बीर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन पत्रकार अरुण जावळे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ. सतिश बाबर, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. सुहास पोळ, डॉ. गितांजली पोळ, चंद्रकांत खंडाईत, विजयराव गायकवाड, अनंता बाघमारे, नारायण जावलीकर, आदीनाथ बिराजे, गणेश कारंडे, हरिदास जाधव, प्रशांत पोतदार, प्रज्वल मोरे, वैभव गायकवाड, सागर गायकवाड, आदी  बहुसंख्येने उपस्थित होते