फलटण दि.२३(प्रतिनिधी): - कृषि विभागा मार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने सातारा सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नावीन्य पूर्ण बाब म्हणुन कृषी प्रदर्शन मध्ये 11स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत घोषित करण्यात आलेले फलटण जिल्हा सातारा पासून 20 किलो 18 किलो मीटर अंतरावर असलेले फलटण च्या दक्षिण दिशेला असलेल्या गावात 19 प्रकारची फळे सलग व 6 प्रकारची फळं झाडे बांधावरअशी एकूण 26 प्रकारचे फळझाडे लागवड या ठिकाणी केलेले आहेत याची सविस्तर माहितीदेणारे प्लेक्स द्वारे स्टॉल तयार करण्यात आली होती तसेच स्टॉल मध्ये शेतकऱ्यानी पिकविलेल्या फळांच्या टोकरी ठेवण्यात आले होते
कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेटी प्रसंगी कृषि मंत्री यांनी जाणवून घेतले विविध फळंपिकाची माहिती गावातील फळपीक विषयी महेंद्र धुमाळ,सुशील फडतरे, दत्तात्रय धुमाळ, समीर पवार, त्रिंबक फडतरे यांनी माहिती दिली यावेळी कृषि सेवा रत्न सचिन जाधव यांनी या गावात कृषि विभाग रबविण्यात येत असलेले फळंबाग लागवड चे विविध उपक्रम बाबत माहिती दिली
फळांचे गाव धुमाळवाडी इतर गावांसाठी आदर्श असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले
भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या विविध फळ पिकांविषयी माहिती घेऊन तसेच फळं उत्पादन बाबत तसेच कष्ट व परिश्रमाच्या जोरावर फळबाग लागवड करून एक आदर्श इतर गावांसाठी केले असल्याची सांगितले आणि शेतकऱ्यांनचे व कृषि विभागचे केले कौतूक
यावेळी प्रधान सचिव कृषि मा विकास चंद्र रस्तोगी विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर उमेश पाटील,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलीद मोमीन तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड तसेच सातारा सांगली, कोल्हापूर विभागचे अधिकारी उपस्थित होते