महामानवांच्या विचारांनी उजळणार समाजमन! रिपब्लिकन समता पार्टीचा ‘शैक्षणिक’उपक्रम जयंती उत्सवाचा नवा आदर्श
महामानवांच्या विचारांचा वारसा, शिक्षणातूनच खरा विकास!UPSC-MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; संदर्भ ग्रंथालये उभारावे
08 April, 2026
समाजमन! रिपब्लिकन समता पार्टीचा ‘शैक्षणिक’ उपक्रम; जयंती उत्सवाचा नवा आदर्श
समाजमन! रिपब्लिकन समता पार्टीचा ‘शैक्षणिक’ उपक्रम;
जयंती उत्सवाचा नवा आदर्श
पुणे/मुंबई जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा: —
बहुजन समाजातील महामानवांच्या विचारांचा जागर करताना यंदाच्या जयंती उत्सवाला वेगळी दिशा देण्याचा निर्धार रिपब्लिकन समता पार्टीने केला आहे. २६ मार्च रोजी सम्राट अशोक जयंती, ११ एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले जयंती आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या त्रिवेणी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर
पुणे/मुंबई : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा — बहुजन समाजातील महामानवांच्या विचारांचा जागर करताना यंदाच्या जयंती उत्सवाला वेगळी दिशा देण्याचा निर्धार रिपब्लिकन समता पार्टीने केला आहे. २६ मार्च रोजी सम्राट अशोक जयंती, ११ एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले जयंती आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या त्रिवेणी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर “जल्लोषाबरोबरच ज्ञानोत्सव” साजरा करण्याचे आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी केले आहे.
‘वर्गणीमुक्त’ जयंतीचा निर्धार
सण-उत्सवांच्या निमित्ताने राजकीय नेते किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्याची पद्धत मोडीत काढत, पक्षाने यंदा स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्याकडून आर्थिक मदत मागू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जर समाजातून स्वेच्छेने निधी मिळालाच, तर तो गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी—फीस, पुस्तके, वह्या, गणवेश—यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“शिक्षणाने सजवूया जयंती!”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी यंदा जयंती उत्सव शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यावर भर देण्यात आला आहे.
पुस्तक दान अभियान: हार-तुरे अर्पणाबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
ग्रामस्तरावर ग्रंथालये: प्रत्येक गावातील समाज मंदिरात लहान ग्रंथालय उभारण्याचा संकल्प.
स्पर्धा परीक्षा मदत: UPSC, MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देणे.
विचार साहित्य वितरण: महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे साहित्य घरोघरी पोहोचवणे.
संघटन बळकटीवर भर
राज्यातील परिस्थिती लक्षात घेता “जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ” या विचारधारेखाली प्रत्येक तालुक्यात किमान दोन हजार कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर दहा हजार तरुण कार्यकर्त्यांचे संघटन तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.
सामाजिक परिवर्तनाचे नवे मॉडेल
“उत्सवातून समाजाला प्रत्यक्ष काय मिळते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अनावश्यक खर्च टाळून एखाद्या होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तरच समतावादी समाजाची उभारणी शक्य आहे,” असे सुरेश बोतालजी यांनी स्पष्ट केले.
रिपब्लिकन समता पार्टीचा हा ‘शैक्षणिक’ उपक्रम केवळ जयंती उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी मॉडेल ठरत आहे. भपकेबाजीपेक्षा ज्ञानाची पेरणी करणारा हा ‘समता उत्सव’ राज्यभर चर्चेचा विषय ठरत

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!