single-post

मुंबईतील मंत्री गोरे आमदार शिंदे यांच्या भेटीने ,साताऱ्याच्या राजकारणात 'जय-वीरू'चा उदय..!; साताऱ्यात राजकीय भूकंपाचे संकेत! मंत्री गोरेंच्या चालीने कोरेगाव ला हादरे..

भाजपची ताकद वाढविण्यात जिल्ह्यात भाजप पक्ष वाढविण्यात गोरे-निंबाळकर जोडी यशस्वी; कोरेगावमध्ये नवीन समीकरणाचा उदय होण्याची शक्यता ! मुंबईतील गळाभेटीने वाढविले विरोधकांचे धाबे दणाणले; नगरपंचायत निवडणूक होणार ‘हायव्होल्टेज’

23 March, 2026

मुंबईतील गळा भेटले मंत्री गोरे आमदार शिंदे यांच्या भेटीने,साताऱ्याच्या राजकारणात 'जय-वीरू'चा उदय;साताऱ्यात राजकीय भूकंपाचे संकेत! मंत्री गोरेंच्या चालीने कोरेगाव  ला हादरे..!

सातारा  | दि. 23 मार्च 2026 (जरंडेश्वर  समाचार वृत्त जनसेवा):-

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आता भाजपने आपली पाळेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली असून, या परिवर्तनाचे सुत्रधार म्हणून मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जोडी निर्णायक ठरताना दिसत आहे.

कोरेगावचा पेच आणि गोरेंची 'मास्टरस्ट्रोक' खेळी

​कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. याच संधीचा फायदा घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या भागात आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. मात्र, निर्माण झालेली ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत चाणाक्ष खेळी खेळली. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ घालत गोरेंनी कोरेगावमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा एकवटली आहे.

मुंबईतील 'ती' गळाभेट; फक्त प्रेम की राजकीय संकेत?

​आज दि. २३ मार्च २०२६ रोजी मुंबईत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांनी पत्रकारांसमोर घेतलेली गळाभेट सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. ही केवळ औपचारिक भेट नसून, विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारा एक मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. आगामी निवडणुकांसाठी ही 'जय-वीरू'ची जोडी सज्ज असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

नगरपंचायत आणि जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व?

  • नगरपंचायत निवडणूक: अवघ्या ८-९ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आता हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. गोरे-शिंदे जोडीने आतापासूनच या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत जयकुमार गोरेंचे वाढते वर्चस्व राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सहकार क्षेत्रातही आता भाजप आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे.
  • विरोधकांसाठी धोक्याचा इशारा:

    राष्ट्रवादी (शरद पवार गट व अजित पवार गट), शिवसेना, काँग्रेस आणि मनसे या पक्षांना आता केवळ फेसबुक-ट्विटरवर मर्यादित न राहता संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी करावी लागेल. अन्यथा, कोरेगाव आणि आसपासच्या भागात सत्ता समीकरणे पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


     परिवर्तनाची नांदी!

    ​आजची गळाभेट ही केवळ एका दिवसाची घटना नसून, साताऱ्याच्या राजकारणातील आगामी 'सत्ता पालटाची नांदी' आहे. जयकुमार गोरेंचे 'किंगमेकर' म्हणून समोर येणे, हे जिल्ह्याच्या राजकारणात नवे वळण घेऊन येणार, हे आता निश्चित झाले आहे.