साताऱ्यात अटकेवरून रणकंदन: "माझे अपहरण झालेच नाही!" बापूसाहेब शिंदेंचा पोलिसांत अर्ज; तरीही अटकेची कारवाई का?
माझे अपहरण झालेच नाही!" बापूसाहेब शिंदेंचा पोलिसांना निर्वाणीचा अर्ज; तरीही अटकेचा घाट का?पालकमंत्री शंभूराज देसाईंचा संताप: "जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करा"; साताऱ्यात पोलीस कारवाईवरून रणकंदन!
21 March, 2026
साताऱ्यात अटकेवरून रणकंदन: "माझे अपहरण झालेच नाही!" बापूसाहेब शिंदेंचा पोलिसांत अर्ज; तरीही अटकेची कारवाई का?
सातारा, दि. २१: (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आता 'अटक' प्रकरणावरून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बापूसाहेब शिंदे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन "माझे अपहरण झालेले नाही" असा अर्ज दिला असतानाही अनिल देसाई आणि संदीप मांढवे यांना अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
???? पहाटेचा तो अर्ज आणि पोलिसांची कृती
मिळालेल्या माहितीनुसार, बापूसाहेब शिंदे यांनी पहाटे ५ वाजता पोलीस ठाण्यात जाऊन लेखी स्वरूपात स्पष्ट केले की त्यांचे कोणीही अपहरण केलेले नाही. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर अटकेची कारवाई केली. "जर तक्रारदारच म्हणतोय की गुन्हा घडला नाही, तर ही अटक नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली?" असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
⚖️ पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक; एसपींच्या निलंबनाची मागणी!
या संपूर्ण प्रकरणावर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस यंत्रणेवर थेट निशाणा साधत खालील गंभीर आरोप केले आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख यांनी एकूण या प्रकरणाबाबत खुलासा करावा जेणेकरून लोकांना याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!