single-post

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा 'हाय व्होल्टेज' भगवा; राष्ट्रवादी-शिवसेनेला धोबीपछाड!

एका मताने फिरवले नशीब; भाजपची अनपेक्षित मुसंडी! ​साताऱ्याच्या राजकारणात मोठा उलटफेर; ३२ विरुद्ध ३१ मतांनी सत्तापालट. ​प्रिया शिंदे - राजू भोसले जोडीचा विजय; राष्ट्रवादी-शिवसेनेला धक्का.

20 March, 2026

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा 'हाय व्होल्टेज' भगवा; राष्ट्रवादी-शिवसेनेला धोबीपछाड!

प्रिया शिंदे अध्यक्ष, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी वर्णी; ३3 विरूद्ध 29 मतांनी सत्तापालट

सातारा दि. 20 मार्च 20 ते 26 (जरंडेश्वर समाचार):

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत सोमवारी अभूतपूर्व ‘हाय व्होल्टेज’ राजकीय नाट्य पाहायला मिळाले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने 33 सदस्यांचे संख्याबळ सिद्ध करत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीला अवघ्या एका मताने पराभवाचा धक्का बसला आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाने सातारकर अवाक

​जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या तीव्र स्वरूपाची फोडाफोडी आणि सदस्यांची पळवापळवी पाहायला मिळाली. मतदानाच्या दिवसापर्यंत दोन्ही बाजूंकडून संख्याबळाचे दावे-प्रतिदावे केले जात होते. सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिग्गज नेत्यांनी स्वतः 'कवच' बनून त्यांना सभागृहापर्यंत आणले. पोलीस प्रशासनाने जिल्हा परिषद परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने छावणीचे स्वरूप आले होते.

अटीतटीचा संघर्ष: ३3 विरुद्ध 29

​निवडणूक प्रक्रियेत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीने ३१ सदस्यांचे पाठबळ असल्याचे दाखवले, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी भाजपने ३२ मते खेचून आणत सर्वांनाच धक्का दिला. या एका मताच्या फरकाने सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली आणि महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

गुलाल भाजपचा, विरोधकांत शांतता

​निकाल जाहीर होताच जिल्हा परिषद इमारतीबाहेर उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘जय श्रीराम’ आणि ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत नवनर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. दुसरीकडे, विजयाचा आत्मविश्वास असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गोटात कमालीची शांतता आणि निराशा दिसून आली.

राजकीय समीकरणे बदलणार?

​या निकालामुळे साताऱ्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी मते कोणाची फुटली आणि कोणामुळे युतीला पराभव पत्करावा लागला, याची चर्चा आता जिल्हाभर सुरू आहे. या विजयाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.