अजितदादांच्या विरहानं जिल्हा हळहळला; पण सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादी-शिवसेनेचाअखेर 'गेम' ठरणार निर्णायक! सातारी हिसका! 'मिनी मंत्रालयात' कुणाचा राबता? महायुतीचं घोडं पळणार की स्वाभिमानी गट 'अश्वमेध' रोखणार?
लय झालं राजकारण... आता साताऱ्यात 'मैदान' गाजणार! भाजपला 'डच्चू' मिळणार की राष्ट्रवादी-शिवसेना गुण्यागोविंदाने नांदणार?
25 February, 2026
सातारी हिसका! 'मिनी मंत्रालयात' कुणाचा राबता? महायुतीचं घोडं पळणार की स्वाभिमानी गट 'अश्वमेध' रोखणार?
साताऱ्याच्या गादीवर आता 'कौल' कुणाचा? युतीचा जुगार की अस्तित्वाची लढाई; २० मार्चला ठरणार मिनी मंत्रालयाचा धनी!
सातारा | दि.२५ फेब्रुवारी 202६ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा जिल्ह्याच्या राजकारणाने आजवर अनेक वळणे पाहिली, पण आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती निवडीच्या निमित्ताने उभे राहिलेले चित्र अत्यंत गुंतागुंतीचे आणि संभ्रमाचे बनले आहे. २० मार्चपूर्वी या निवडणुका पार पडणार असल्या तरी, साताऱ्याच्या 'मिनी मंत्रालयात' भाजपचा अश्वमेध घोडा रोखला जाणार की सत्तेच्या अपरिहार्यतेपोटी 'महायुती'चा जुगार खेळला जाणार, यावर सध्या गल्लीपासून सातारा पर्यंत पैजा लागल्या आहेत.
काही काळापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी झालेली बैठक जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.मंत्री मकरंद पाटील, मा.सभपती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी पालकमंत्री आ.शशिकांत शिंदे, खासदार नितिन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत 'दोघांनी एकत्र येऊन सत्तेचे समसमान वाटप' करण्याचा सूर उमटला होता. जर राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आले, तर सहापैकी प्रत्येकी तीन पदे पदरात पाडून घेता येतील. मात्र, भाजपला सोबत घेतल्यास प्रत्येकाच्या वाट्याला केवळ दोनच पदे येतील. महत्त्वाचा प्रश्न असा की, भविष्यात भाजपचे वाढते वर्चस्व राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अस्तित्व संपवणार का? ही भीती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. म्हणून भाजपला रोखणे आता काळाची गरज आहे अशी चर्चा सातारा जिल्ह्यातील जनता करीत आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या अजितदादा पवार यांच्या निधनावरून मोठा गदारोळ सुरू आहे. हा अपघात होता की घातपात? यावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे सातारा जिल्ह्यातील चहाच्या टपरीपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत केवळ याच विषयाची चर्चा आहे. जनसामान्यांमध्ये या घटनेबद्दल प्रचंड संभ्रम आणि संताप असून, रोहित पवारांच्या रोजच्या नवीन खुलाश्यांमुळे संशयाची सुई फिरत आहे. अशा संवेदनशील वातावरणात सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत.
भाजपा 'त्याग' करणार की 'आग्रह' धरणार?
अजितदादांना आदरांजली म्हणून भाजप साताऱ्याचे अध्यक्षपद राष्ट्रवादीसाठी सोडणार का? हा मोठा प्रश्न आहे. मात्र, भाजपने जिल्ह्यात नगरपालिका आणि अन्य संस्थांमध्ये केलेली घोडदौड पाहता, ते सहजासहजी सत्ता सोडतील अशी चिन्हे दिसत नाहीत. स्थानिक नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे मने दुखावली गेली आहेत, त्यामुळे बरच पाणी पुलाखालून निघून गेले आहे. 'वरच्या' आदेशाशिवाय युती होणे अशक्यप्राय वाटते.
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. मात्र, साताऱ्यात निर्माण झालेली ही विचित्र परिस्थिती एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देत आहे. २० मार्चच्या आत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. जनतेने या काळात शांतता राखणे गरजेचे असले तरी, सत्तेच्या या खेळाचे 'घोडामैदान' आता फार लांब नाही. काही झालं तरी अजितदादा पवार गटाचा जिल्हाध्यक्ष होईल अशी चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून शिवसेना आणि भाजपाने मोठेपण दाखवावे अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील जनता करीत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय