गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीचा कोळकी ते देशभर यशस्वी गरुड भरारी– एका स्वप्नाची यशोगाथा..!
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. चा ३०वा वर्धापनदिन या कंपनीने सातारा जिल्ह्याला दिली नवी ओळख; शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत विश्वासाचा प्रवास..!
20 September, 2025
“शेतकऱ्यांचा मेहनत,घाम वाया जाऊ नये, त्यांना न्याय्य,दूधाला चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे” — या ध्येयवाक्यासह श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी १९९५ साली फलटण तालुक्यातील कोळकी या छोट्याशा गावातून गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. ची स्थापना केली. आज या कंपनीने सातारा जिल्ह्यातून सुरू केलेला प्रवास भारतभर सुरू झाला आहे. या कंपनीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या या कंपनीने यशस्वी गरुड झेप घेतली आहे आज कंपनीचा तिसावा वर्धापन दिन त्यानिमित्त..!
आज ३० वर्षांनंतर ही संस्था फक्त सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत आपली ठसा उमटवत आहे. "३० वर्षे विश्वासाची आणि शुद्धतेची" या घोषवाक्यासह नुकताच भव्य 30 वा.वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थापनेची पार्श्वभूमी आणि उद्देश
फलटण तालुका हा दुष्काळी पट्ट्यात मोडणारा भाग. येथील शेतकऱ्यांना शेतीवर एकट्याने अवलंबून राहणे धोक्याचे ठरू लागले होते. अशा वेळी दुग्धव्यवसाय हा एक पर्याय ठरला. पण स्थानिक व्यापाऱ्यांच्या शोषणामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता.
या समस्येवर उपाय म्हणून गोविंद डेअरी उभी राहिली. उद्दिष्टे स्पष्ट होती:
शेतकऱ्यांना न्याय्य भाव व हमीभाव.
शुद्ध व उच्च गुणवत्तेचे दुग्धउत्पादन.
दुग्धव्यवसायाचे आधुनिकीकरण.
समाजाचा सर्वांगीण विकास.
वाढीचे टप्पे – एक भव्य प्रवास
१९९५: कोळकी येथे लहानसा दुग्धसंग्रह केंद्र सुरू.
२०००: पहिला मोठा विस्तार – नवीन उपकरणे, कोल्ड स्टोरेज सुविधा.
२००५: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादन पोहोचले.
२०१०: ISO 22000:2005 आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळाले.
२०१५: ऑनलाईन ऑर्डरिंग आणि डोअर-डिलिव्हरी सेवा सुरू.
२०२०: सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा दुग्धउद्योग.
२०२५: तिसऱ्या दशकात दमदार प्रवेश, ५००+ शेतकऱ्यांशी थेट जोडणी.
शेतकऱ्यांचा विश्वास – या यशामागची खरी ताकद
कोळकी व आसपासच्या गावांतील शेतकरी आज गोविंद डेअरीशी जोडलेले आहेत. “पूर्वी व्यापाऱ्यांकडे दूध विकल्यावर पैसे वेळेवर मिळत नसत, कधी दर पडत असे, तर कधी दूधच वाया जायचं. आता मात्र गोविंद डेअरीमुळे हमीभाव, वेळेवर पैसे आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळतं,” असं स्थानिक शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा:
पशुवैद्यकीय सेवा व तज्ञांचे मार्गदर्शन
जनावरांच्या आहारासाठी सल्ला व मदत
वेळेवर दूध खरेदी व तात्काळ भरणा
आधुनिक दुधसंग्रह उपकरणांची उपलब्धता
गुणवत्तेचा जागतिक दर्जा कंपनीने सुरुवातीपासूनच गुणवत्तेवर कधीच तडजोड केली नाही. दुधाच्या प्रत्येक बॅचची चाचणी अत्याधुनिक प्रयोगशाळेत केली जाते. यामुळेच ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला.
प्रमुख उत्पादने:ताजे दूध: पास्च्युराईझ्ड आणि सामान्य
दुग्धपदार्थ: दही, लोणी, ताक, पनीर
मिठाई: श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम
विशेष उत्पादने: प्रोटीन दूध, आयोडीनयुक्त दूध
पावडर उत्पादन: स्किम्ड व व्होल मिल्क पावडर
गोविंद डेअरीचे घी हे तिरुपती बालाजी मंदिरासारख्या प्रतिष्ठित संस्थांना पुरवले जाते, हे या गुणवत्तेचे प्रमाण आहे.
समाजकारणासोबत उद्योगकारण-
श्री. संजिवराजे नाईक निंबाळकर हे फक्त उद्योगपती नाहीत, तर समाजकारणाची जाण असलेले नेते आहेत. त्यांनी रोजगारनिर्मिती, शिक्षण, स्थानिक विकास यावर भर दिला आहे.
५००हून अधिक कुटुंबांना थेट रोजगार
१,०००+ कुटुंबांना अप्रत्यक्ष रोजगार
शाळा-महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य
दुष्काळी भागात पाणीटंचाई निवारणासाठी मदत
भव्य ३० वा वर्धापन दिन सोहळा
कोळकी येथील मुख्यालयात आयोजित सोहळ्यात शेकडो शेतकरी, स्थानिक नेते, कृषितज्ज्ञ आणि नागरिक सहभागी झाले.
ठळक क्षण:कंपनीच्या प्रवासावर आधारित माहितीपट सादर
दीर्घकाळ कंपनीसोबत असलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार
नवीन उत्पादन ओळ (सोया दूध, बदाम दूध) उद्घाटन
सांस्कृतिक कार्यक्रम व अन्नदान
भविष्यातील वाटचाल,व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले: "आमचे पुढील ध्येय म्हणजे उत्पादन क्षमता दुप्पट करणे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरणे. शेतकरी आणि ग्राहक दोघांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे भांडवल आहे."
भविष्यातील योजना:सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प
जैविक विघटनशील पॅकेजिंग
डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांशी थेट संवाद
पर्यावरणपूरक उद्योगासाठी कार्बन फुटप्रिंट कमी करणे
सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत योगदान,दुग्धव्यवसाय हा सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. गोविंद डेअरीमुळे या क्षेत्रात सरासरी १५% वार्षिक वाढ होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, तरुणांना रोजगार मिळाला आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चा ३० वर्षांचा प्रवास हा फक्त उद्योगाचा इतिहास नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमांचा गौरव, ग्राहकांच्या विश्वासाचा सन्मान आणि समाजकारणाच्या परंपरेचे प्रतीक आहे.
कोळकीसारख्या गावातून उभा राहिलेला हा उद्योग आज संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरला आहे. पुढील तीन दशकांत कंपनीच्या सर्व कर्मचारी यांच्या विविध संकल्पनेतून आज गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव भारतीय दुग्धउद्योगात मोलाचा ठसा उमटलेला आहे, यशस्वी गरुड भरारी या कंपनीने घेतलेले आहे कंपनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
-सुरेश बोतालजी संपादक जरंडेश्वर समाचार,
मो-९१ १२ ६५० ६५०