कोरेगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक नगरपंचायतीने उभारावे -सुरेश बोतालजी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार
कोरेगाव शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक बांधण्यासंदर्भात आमदार महेश शिंदे यांना दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी निवेदन सादर करणार
13 August, 2025
कोरेगाव दि.१३(जरंडेश्वर समाचार): कोरेगाव नगरपंचायतीने कोरेगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारावे याकामी कोरेगाव नगरपंचायत च्या नगराध्यक्षा दिपाली बर्गे यांना निवेदन सादर करण्यात आले असून या कामी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे तसेच मुख्याधिकारी यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी केली आहे.
नगरपंचायतीला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने आज दि.१३ ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा निवेदन सादर करण्यात आले असून त्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावे अन्यथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी दिला आहे .
कोरेगाव नगर पंचायतीने कोरेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी कोरेगाव नगरपंचायतीला एक वर्षांपूर्वी भारतीय बहुजन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले होते परंतु कोरेगावच्या नगरपंचायतीने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून कोरेगाव चे विद्यमान आमदार महेश शिंदे यांना दि. 15 ऑगस्ट२०२५ रोजी पुतळा बसवण्यासंदर्भात निवेदन सादर करणार असल्याचे बोतालजी यांनी म्हटले आहे.
कोरेगाव चे लोकप्रिय आमदार महेश शिंदे हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कोरेगाव शहरांमध्ये बसवतील अशी खात्री आम्हा सर्वच मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाटत आहे म्हणून 15 ऑगस्ट ला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारका संदर्भात आमदार महोदय यांच्याशी चर्चा विचार विनिमय करून निवेदन सादर करणार असल्याचे सुरेश बोतालजी यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरेगाव प्रांताधिकारी व सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दि.१५,१६ ऑगस्ट चे होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही आमची अस्मिता आहे अण्णाभाऊ साठे यांचे या महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे, रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला आहे. एक थोर समाजसुधारक, लोककवी, लोकशाहीर आणि जगद्विख्यात लेखक असून त्यांनी दलित आणि वंचितांच्या जीवनावर अनेक लेखन केले. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि दारिद्र्य यांविरुद्ध आवाज उठवला. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्ये, नाटकं, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णने अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी जवळपास ३५ पुस्तके लिहिली आहेत. अशा महान साहित्यरत्न लोकशाही साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरामध्ये उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधारी यांनी ही मागणी मान्य करून कोरेगाव शहरांमध्ये भव्य दिव्य असा पुतळा व स्मारक उभे करावे अशी पुन्हा एकदा मागणी नगरपंचायत कडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्या मान्य न केल्यास कोरेगाव तालुक्यातील मातंग समाज बांधव हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत आहोत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही आमची अस्मिता आहे अण्णाभाऊ साठे यांचे या महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे, रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला आहे. एक थोर समाजसुधारक, लोककवी, लोकशाहीर आणि जगद्विख्यात लेखक असून त्यांनी दलित आणि वंचितांच्या जीवनावर अनेक लेखन केले. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि दारिद्र्य यांविरुद्ध आवाज उठवला. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्ये, नाटकं, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णने अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी जवळपास ३५ पुस्तके लिहिली आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरामध्ये उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधारी यांनी ही मागणी मान्य करून कोरेगाव शहरांमध्ये भव्य दिव्य असा पुतळा व स्मारक उभे करावे अशी पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी करत आहे यावर कारवाई न केल्यास कोरेगाव तालुक्यातील मातंग समाज बांधव हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देत आहोत.
याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील.