single-post

जलजीवन अंतर्गत केलेले कामाची बिले न मिळाल्याने हर्षद पाटील याने केली आत्महत्या सातारा जिल्ह्यातील कंत्राटदार झाला आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर केले आंदोलन

हर्षद पाटील या कंत्राटदारांने आत्महत्या केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील कंत्राटदार झाला आक्रमक ;राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करत हर्षद पाटील यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

25 July, 2025

दि.२४ प्रतिनिधी:-सातारा जिल्ह्यातील ठेकेदार आक्रमक झाले असून सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात घोषणाबाजी करत कंत्राटदार हर्षद पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण केलं आहे परंतु राज्य सरकारकडून निधी येत नसल्यामुळे लोकांची देणे देणे शक्य होत नसल्याने तसेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा परिषदेवर जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार एकत्रित येऊन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला,

यावेळी हर्षद पाटील यांना सातारा जिल्हा कंत्रालदार महासंघ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली, अनेकांनी आपल्या भावना यावेळी जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्येच व्यक्त केल्या.सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील याने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. जलजीवन मिशनच्या कामाची बिले राज्य सरकारने काढली नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केल्याचा दावा सातारा जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर महासंघाने केला आहे.  जिल्ह्यातील सर्व ठेकेदारीने या घटनेचा जाहीर निषेध केला असून सातारा जिल्हा परिषदेचा परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडलं, यावेळी सातारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष चव्हाण तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज दिनांक २६  जुलै २०२५ सकाळी १२ वा. रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करणार आहेत .

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाच्या कोनशिलेवर हर्षद पाटील आणि अक्षय पाटील या दोन ठेकेदारांचीच नावे आहेत. अक्षय पाटील हा मूळ ठेकेदार असून हर्षद पाटील याचा भाऊ आहे. हे काम 100 टक्के पूर्ण केले  आहे.

हर्षद पाटील याने वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी, कणेगाव, मालेवाडी, आहिरवाडी आणि शिराळा तालुक्यातील पं.त.वारूण आणि चिंचोली या गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे केली आहेत. हर्षद पाटील यांनी स्वत:च्या तांदुळवाडी आणि मालेवाडी या गावातील कामे सी. एस. पाटील या मूळ कंत्राटदाराकडून उपकंत्राटदार म्हणून केले. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत. कणेगाव येथील काम त्याने जुबेर इनामदार यांच्याकडून घेतले होते. तेथे 100 टक्के पूर्ण झाले आहे. पण वाळवा तालुक्यातील आहिरवाडी येथील डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., शिराळा येथील पं.त.वारूण येथील काम अनुक्रमे 80 आणि 90 टक्के पूर्ण झाले आहे.

राज्य सरकारने या कामांची निविदा काढत 9 कोटी 67 लाख 93 हजारात कामे दिली होती. या कामाच्या पोटी शासनाने मूळ कंत्राटदारांना 6 कोटी 94 लाख 18 हजारांची रक्कम दिली आहे. पण जवळपास 1 कोटी 73 लाख 75 हजारांची रक्कम अद्याप देणे बाकी आहे. ज्यात हर्षद पाटील याच्या कामाची रक्कम 1 कोटी 47 लाखांची आहे.जर जिल्हा परिषदेनं मूळ कंत्राटदार यांची रखडलेली जवळपास 1 कोटी 73 लाख 75 हजारांची रक्कम दिली असती तर हा अनर्थ टळला असता. मुळात शासनाकडूनच देय मिळाले असते तर त्यातून हर्षद पाटील याच्या कामाचे देय देता आले असते आणि त्याचे 65 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचं कर्ज फिटले असते. त्याचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील व राज्यातील कंत्राटदार संघटना आक्रमक झाली असून सरकारला धारेवर धरले जात आहे. याआधी देखील हाच मुद्दा जयंत पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित करत राज्य सरकारने कंत्राटदारांचे देय द्यावेत अन्यथा त्यांना आत्महत्या कराव्या लागतील असा इशारा दिला होता. आता अधिवेशन संपून आठ दिवसही होत नाही. तोच सांगलीतील कंत्राटदाराने जीवन संपवले, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.